‘प्रेम’ या अडिच शब्दांत मानवी जीवनाच्या यशाचं रहस्य लपलेलं आहे. प्रेम म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचा मनामध्ये उत्पन्न झालेला निसर्गदत्त उत्कट भाव निसर्गदत्त यासाठी की ह्या उत्कटतेमध्ये मानवी हस्तक्षेप नसतोच. मनामध्ये उत्पन्न झालेली ही उत्कटता खरोखरच नैसर्गिक असेल तर तिला जात, पंथ, धर्म, वर्ण यांच कृत्रिम बंधन असून चालत नाही. म्हणूनच म्हटल्या जातं की, प्रेम ठरवून करता येत नाही ते व्हावं लागलं. लेखिका गायत्री पुनकर यांच्या ‘मी आहे ना !’ ह्या लघुकादंबरीतसुद्ध अशाच एका उत्कट प्रेमाची हृदयस्पर्शी कथा सांगितलेली आहे.
लेखिकेची भाषा प्रभावी असून कथनशैली वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण करणारी आहे. त्यामुळे वाचक आपोआपच कथेत गुंतून जातो. नायक आणि नायिकेच मनोमिलन केव्हा घडून येईल आणि त्यांच्या प्रेमाला न्याय केव्हा मिळेल अशी उत्कंठ वाचकांच्याही मनाला लागून जाते आणि हेच लेखिकेचे खरे यश म्हणावे लागेल.
कथेचा आवाका फार मोठा नसला तरी जिज्ञासा हा उत्कृष्ट कथेचा महत्त्वाचा गुष् लेखिकेने फार कौशल्याने सांभाळला आहे. संपूर्ण कथेत नायक-नायिकेच्या मनातील प्रेमाचे पावित्र्य सांभाळताना आणि त्या निरागस प्रेमाची सांगता करताना लेखिकेने जा तोल सांभाळला आहे, तो सुद्धा खरोखरच कमालीचा आहे.
Reviews
There are no reviews yet.