प्राचीन व अर्वाचीन समाज जीवन व्यक्ती जीवन जगण्याचा उद्देश त्यात झालेला बदल त्यामूळे जीवन जगण्यातील झालेली जटिलता, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, जीवन जगण्यात्साठीच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा हेच स्वीकारले. पण त्या मिळवण्यासाठी रोजगाराच्या संधी हवी याकडेच दुर्लक्ष केले. रोजगार संधी मिळवण्याच्या पात्रतेत कठिणता निर्माण केल्या. श्रमशक्ती बरोबरच कौटुंबिक जीवनात बाधकता निर्माण केल्या. संपूर्ण श्रमशक्तीला रोजगार प्राप्त असणे आजची सर्वात महत्वाची गरज आहे. कारण अन्नाची गरज सर्वांना असते. एक सकारात्मक विचार, सदर बाबीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्येकाला आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार संपूर्ण शिक्षण मोफत, शिक्षण संपताच नोकरी, कायम स्वरुपी निवास व्यवस्था व परिपूर्ण आरोग्य सुविधा तेही जातीय बंधना शिवाय. गरीब श्रीमंत भेदभाव न करता अगदी रस्त्यावरील भिकाऱ्याच्या मुलांना ही संघी असेल अशी व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे. अगदी शंभर टक्के शक्य आह! यासाठी शासनाकडून आर्थिक मदतीची गरज नाही. हो असे शक्य आहे. विश्वास बसत नाही ना ! बरोबर आहे. कारण आपण चाकोरी बाह्य विचार करीत नाही. त्याच बार्बीवर कित्येक दशके प्रगत राष्ट्राचा प्रगती अर्थशास्त्र व आपल्या मधील त्रुटीचा अभ्यास करून, आपला भूभाग नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे, जलसंपत्ती, लोक जीवनाच्या मानसिकतेचा अभ्यास करुन व्यवहारी निष्कर्ष आहेत. साधारण तीन हजार प्रश्न (प्रॉब्लेम) आहेत. त्यावरील पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्याचे लिखाण कथा रुपात तयार आहे ते कथारूप प्रकाशित करावे की विचारपुष्प लेख स्वरुपात प्रकाशित करावे या विचारात आहे. त्यातील बरेचशे लेख पुढारी, लोकमत वर्तमान पत्रात प्रकाशीतही केले आहेत. आधुनिक फेसबुक माध्यामातूनही प्रकाशित आहेत. हा माझा सामाजिक ऋण फेडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.