पैसा अडका विषयभोग आहे विनाशाचे कारण। सदा करावे नामस्मरण ।।
सर्वभोग विनाशी आहेत व क्षणभगूर सुख देतात, हा सिद्धान्त आपल्याला शास्त्र, वेद, पुराण व संत वाङमयातून बा मिळतो. एक आत्मसुखच शाश्वत सुख देते. हा उच्च विचार जन श्लोकातून आला आहे.
आशाप्रकारे सुपूर्ण काव्यसंग्रहात प्रापंचिक सुख व आत्मसुख रा उत्तम प्रकारे तुलना केली आहे. व प्रपंच करूनही चांगल्याप्रकारे परमायाला मिळविता येते हा अर्थपूर्ण विचार काव्यसंग्रहात वाचायला मिळतो.
एकंदरीतच संपूर्ण काव्यसंग्रह हा श्रेष्ठ विचाराची जोपासन करणारा, परमार्थविचार दृढ करणारा व व्यावहारीक सत्तेत (प्रपंचात) उत्तर आचरण करण्यास प्रवृत्त करणारा आहे. उपरोक्त सर्व बार्बीचा विचार केल्यास प्रत्येकाने हा काव्यसंग्रह संग्रही ठेवावा असाच आहे.
लेखिकेचा प्रथमच प्रयत्न आहे व तिने आपले आध्यात्मिक व प्रापंचिक विचार या काव्यसंग्रहाद्वारे समाजा समोर मांडले आहे. हे विचार समाजाला सुसंघटित ठेवून वाचकांचे आध्यात्मिक जीवन उन्नत करण्यात्त निश्चित सहाय्यक ठरतील असा विश्वास व्यक्त करून प्रस्तावना पूर्ण करीतो.
Reviews
There are no reviews yet.