गजलेच्या एका शेरा मधून संपूर्ण आणि अर्थपूर्ण आशय मांडण्याचे सामर्थ्य गजलकारात असते. अक्षरगणवृत्त किंवा मात्रावृत्तात लिहिली जाणारी गजल छंदोबद्ध काव्याचा उत्कृष्ट नमुना असते. मराठी वाडमयात विविध वृत्तांची संख्या १०००च्या आसपास आहे. त्यातील शंभर एक वृत्तात मराठी गजल लिहिली जाते. छंदात, वृत्तात लिहिण्यासाठी वृत्तांची जाण, भाषेचा अभ्यास, मराठी व्याकरणातले बारकावे, शब्दाशी खेळण्याची कमालीची कसब असावी लागते.
अलिकडच्या काळात सिराज शिकलगार यांचं आयुष्य केवळ गजलमय झालेलं आहे. त्यांनी मराठी गजलेत अभिनव प्रयोग केला आहे. त्यांनी सर्वच मराठी गजलकारांच्या आवडत्या वृत्तात म्हणजे आनंदकंद या एकाच वृत्तात सर्व गजला प्रस्तुत गजलसंग्रहात रसिकांपुढे आणल्या आहेत. वृत्त वगळता कोणत्याही विषयाची, आशयाची आणि अभिव्यक्तीची पुनरावृत्ती न करता प्रासादिक आणि ओघवत्या गजलांची अनुभूती वाचकाला खिळवून ठेवल्याशिवाय रहात नाही.
सिराज शिकलगार यांच्या गझल आनंद या संग्रहास व त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा…!
Reviews
There are no reviews yet.