कुठलेही औषध न घेता, केवळ जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून संपूर्ण आरोग्य प्रदान करणारे, देश विदेशातील ५५ वर्षांचा अनुभव असणारे अॅलोपॅथी व आर्यूवेदाचा चांगला अभ्यास व ज्ञान तसेच अनुभव असणारे योग व निसर्गोपचार क्षेत्रातील जेष्ठ तज्ञ
आ हाराचे, विहाराचे, मनाच्या नियमनाचे परिणाम जाणणं हे प्रत्येक मनुष्याला आवश्यक आहे. ज्या वयांत शिंगे फुटतात त्यावयापासून मनाला मोकाट सोडायला सुरवात होते. त्यांच्या परिणामांबद्दलचा विचार करणं हे व्यक्तीच्याच नव्हे तर समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. सर्वसाधारण व्यक्तीला वैज्ञानिक सिद्धांत समजले नाहीत तरी चालेल. जसे, आपण सर्वजण दुरध्वनी किंवा संगणक वापरतो. ही उपकरणे कुठल्या सिद्धांतावर चालतात हे माहीत नसले तरी चालेल, ती कशी चालवायची हे कळले तरी पुरे. सिद्धांत कळले तर चालवणे अर्थातच सोपे होते. आहाराचे आणि आरोग्याचेही तसेच आहे. त्याचे मुलभूत सिद्धांत आणि नियम काय आहेत, आहाराचे रुपांतर निरोगी शरीरात किंवा आजारात कसे होते तसेच निसर्गनियमांचे पालन दैनंदिन जीवनात कसे करायचे, या सर्व गोष्टींचा सुगम संगम म्हणजे हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.