चारोळी नसते शब्दांची गुंफण, ती तर भावनांनी वसलेलं गाव आशयातून प्रकटते जाणीव, घेते मनामनाचा सहजच ठाव.
अशाच वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या, सुसंस्कृत संस्कारांची, प्रबोधनात्मक सुंदर झालर चढवून, जीवनाच्या विविध पैलूंवर भाष्य करणाऱ्या, दर्जेदार चारोळ्यांची आरासच जणू, कवयित्री अंजली वारकरी यांनी ‘मधुगंध’ मध्ये मांडली आहे.
अल्प शब्दात भव्य आशय असलेला, अंजली वारकरी यांच्या शब्दांचा मधुगंध, वाचता वाचता, हळूच वाचकांच्या हदयापर्यंत पोहचून, त्यांच्या काळजात विराजमान होणार हे निश्चित.
भाषण तसेच निबंध लेखनामध्ये उपयुक्त असणारा ‘मधुगंध’ शालेय विद्यार्थ्यांनी जरूर संग्रही ठेवावा. लहान-थोर सर्वांना दिशादर्शक ठरणारे असे हे अमूल्य संस्कारधन आहे.
अंजली वारकरींनी आत्ममुख होऊन रचलेल्या चारोळ्यांचा ‘मधुगंध’ संग्रह वाचकांना आत्मसुख देवो, ही ईशचरणी कामना आणि अंजली वारकरी यांना पुढील साहित्य निर्मितीस हार्दिक शुभेच्छा !
Reviews
There are no reviews yet.