कविता म्हणजे संवेदनांच्या अत्युत्कट क्षणी निर्माण होणाऱ्या भावनांना उत्स्फूर्तपणे शब्दरूप देणे होय. ती स्फूरण्यासाठी संवेदनशील मन आवश्यक असते. श्री. शशांक देशमुख हे असेच संवेदनशील कवी आहेत. त्यांचा साहित्याचा विशेषतः काव्याचा व्यासंग दांडगा आहे. त्यांचे एक दोन नाही तर तब्बल सात काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय स्तरावरील व राज्यस्तरावरील पुरस्कारांचे ते धनी आहेत. काव्याचा कोणताही प्रकार ते लीलया हाताळतात. त्यांमधून ते खरंखुरं जीवन मांडतात. निसर्गातील सौंदर्याच सुंदर व वास्तव वर्णन करण्याबरोबरच ते समाजातील चांगल्या वाईट बाबीवर सहज व्यक्त होतात. त्यांच्या रचनांमध्ये ‘आदर्शवाद’ आणि ‘सकारात्मक दृष्टीकोन’ हे विशेष गुण ठळकपणे दृष्टीस पडतात. माणुसकी, मानवता, प्रेम, आपुलकी या सवेदनांसोबतच माणसाच्या अंगी हव्या असणाऱ्या जिद्द, चिकाटी, धैर्य, परिश्रम करण्याची तयारी, कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती, सहनशक्ती इत्यादी गुणांचा परिपोष करणाऱ्या रचना ते लिहितात. त्यांच्या व्यासंगातूनच त्यांचे काव्यविश्व साकारले व बहरले आहे. व्यासंगरुपी आकाशात त्यांची प्रतिभा काव्यरुपी पक्ष्यांसारखी मुक्तपणे विहार करते. विविध विषय, आशय व विविध काव्यप्रकार हाताळत असताना विविध प्रतिमा, प्रतीक, अलंकार, मिथके यांचा कौशल्यपूर्वक वापर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या काव्यसंग्रहरुपी माळेत आठवा मणी ‘व्यासंग जडतो तेव्हा’ काव्यसंग्रहाच्या रुपाने भोवला जाणार आहे. ही माळ अधिकाधिक मोठी होत जावी, त्याचा लाभ साहित्यक्षेत्राबरोबरच सामाजिक बदलांसाठी निश्चितच मोठी भूमिका पार पाडो व त्यांच्या व्यासंगाचे व साहित्यसाधनेचे क्षितिज अधिकाधिक विस्तारित होत जावी यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!!
Manas Publication, Marathi, Poem, Shashank Deshmukh
व्यासंग जडतो तेव्हा- Vyasang Jadto Tevha by Shashank De Deshumukh
Original price was: ₹100.00.₹70.00Current price is: ₹70.00.
Reviews
There are no reviews yet.